दीप अमावस्या | Deep Amavasya Speech in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 1, 2025

दीप अमावस्या | Deep Amavasya Speech in Marathi

दीप अमावस्या भाषण

Deep Amavasya Speech in Marathi

Deep Amavasya Bhashan

दीप अमावस्या | Deep Amavasya Speech in Marathi

            आपला भारत देश हा सण-उत्सवांचा देश आहे. येथे प्रत्येक सण साजरा करण्मायामागे काही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात तसेच त्यातून परंपरा जपलेल्या असतात. अशाच सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे दीप अमावस्या होय. हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच आषाढी अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी दिवे लावण्याची, घर-आंगण सजवण्याची व नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या पुराणकथांनुसार या दिवशी स्नान, दान आणि दीपदान याला खूप महत्त्व आहे. असा विश्वास आहे की, दीप अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान करून व दीपदान केल्याने पापांचा नाश होतो व पुण्य प्राप्त होते. तसेच घरामध्ये दिवे लावल्याने अंध:कार दूर होतो आणि सुख-शांतीचे वातावरण निर्माण होते.

            दीप अमावस्येचे ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे. याच दिवसापासून शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची निगा राखण्यास सुरुवात करतात. शेतांमध्ये पिके चांगली यावीत यासाठी देवदेवतांची प्रार्थना केली जाते. शेतकरी बांधव आपल्या बैलांना व पाळीव प्राण्यांना स्नान घालतात, त्यांना सजवतात आणि त्यांची पूजा करतात. यामुळे शेतकरी जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण होतो.

            दीप अमावस्येच्या सणामध्ये स्वच्छतेलाही खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक आपली घरे, अंगणे, देव्हारे स्वच्छ करतात. कारण असे मानले जाते की, पावसाळ्यानंतर स्वच्छता करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी घराघरात दिवे लावले जातात. आजच्या आधुनिक जीवनातही या सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी हा सण उत्साहात साजरा करणे गरजेचे आहे. दीप अमावस्या आपल्याला स्वच्छतेचा, प्रकाशाचा, श्रद्धेचा आणि एकतेचा संदेश देते.


            दीप अमावस्या हा सण साजरा करण्यामागे काही वैज्ञानिक आणि शास्रीय कारणे आहेत.

दीप अमावस्या साजरा करण्यामागे वैज्ञानिक कारणे :-

            श्रावण महिन्याचा हा कालवधी बहुतेक प्राण्यांचा हा प्रजननाचा काळ असतो. म्हणून या काळात प्राण्यांची हत्या केल्यास नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. याचा साऱ्या निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होईल. यामुळे मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत. व सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. या कालावधीत सर्वत्र ओलसर पावसाळी वातावरण असल्याने मांसाहार नीट पचत नाही. तसेच मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो. आजवर मानव जातीचा सर्वाधिक संहार करणाऱ्या विविध साथी या रोगजंतूंमुळेच होतात, हे आपण पाहत आलो आहोत. अशा प्रकारे आपण जंतुसंसर्गाची शक्यता टाळली तर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास थोडा अधिक वाव मिळतो. आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण होते. लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया, बर्ड्स फ्लू अशा घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.


दीप अमावस्या साजरा करण्यामागे शास्रीय कारणे :-

            श्रावण महिन्याच्या कालावधीत अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या उगवतात. व नंतर संपूर्ण वर्षभर पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत. म्हणून शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. व शाकाहारामुळे या दिवसात नीट पचनही होते. या कालावधीत विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. व कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो. अन्य धर्मांमध्ये अत्यंत कडक उपास केले जातात. आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या उपासाचे बंधन तर नाहीच पण केवळ आहारबद्दल करूनही उपास करता येतो. पूर्ण श्रावण महिनाभर आणि गौरी जेवणापर्यंत कडक शाकाहार पाळला जात असे. म्हणून मग त्याआधी या दिवशी मांसाहार केला जात असे.

            शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, दीप अमावस्या हा केवळ दिवे लावण्याचा सण नसून तो आपल्या आयुष्यातील अंध:कार दूर करून ज्ञानाचा व सद्गुणांचा प्रकाश पसरवण्याचा सण आहे. आपण सर्वांनी या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने दीप लावावेत व आपल्या जीवनात सुख-शांती आणावी.

सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

          तुम्हाला दीप अमावस्या | Deep Amavasya Speech in Marathi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad